Monday, October 30, 2006

ऊर्मी

हे असं का होतं किंवा हे असं का झालं? असे प्रष्ण बहुतेक सगळ्यानांच पडत असतील....निदान मला तरी ते पडतात....

आय़ुष्यात अश्या अनेक घटना घडतात जेंव्हा माणुस काहिसा हताश होतो आणि असे प्रष्ण स्वत:ला विचारु लागतो.... गम्मत म्हणजे अश्या घटना खुप गंभीर असायला हव्या असेहि नाहि....

पण का कोण जाणे मला हे प्रष्ण सारखे पडत असतात.....

तेरा वर्षांची मैत्री असलेला घनिष्ठ मित्र जेंव्हा पाठीत सुरा खुपसतो तेंव्हा.....

आपण ज्याला मित्र म्हणुन डोक्यावर घेतलेलं असतं, तो आपल्याला पायदळी तुडवतो तेंव्हा.....

आजपर्यंत केलेल्या आयुष्याच्या वाटचालीत आपण नेहमी फसवलेच गेलो... हे कळते तेंव्हा.....

कोरडा व्यवहार आणि पैश्याच्या ह्या दुनियेत भावना आणि ओलावा ह्यासारख्या फालतु गोष्टींना काहि स्थान नसते हे कटु सत्य अनपेक्षितपणे सामोरे येते तेंव्हा........

अश्या अनेक प्रसंगी मला हे प्रष्ण पडतात.... आणि मनातल्या मनात सुरु होते त्यांची उत्तरे शोधण्याची प्रचंड तडफड....

कधि उत्तरे मिळतात... कधि मिळत नाहित.....

पण तरिही ह्रिदयात ऊर्मी असते... जगण्याची.......

;;