शुक्रवार, डिसेंबर ०८, २००६

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण

एक स्वच्छंदी पाखरू मौजेत उडे बागडे
अवचित दिसता रेशिम मोहात पडे बापडे

मऊसुत रेशिमावर पडे सूर्यकिरण अलवारं
पाखरास केले काबीज चमके सप्तरंगी ऊनं

त्या रंगीत रेशिमलडीस मोहुन पाखरू गेले
शिरताच रेशिमात त्यासी हे उलगडले

मार्ग आत शिरण्याचा असे इंद्रधनु मृगजळ
सुटकेचा मार्गच नाही केले कितीही यत्न

कोळियाने विणले जाळे पाखरू भुलुनी फसले
आकांत ऐकण्या त्याचा एकांती कोण असे?

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण
परि घट्ट किती ही विण!!

6 प्रतिसाद्:

Gayatri म्हणाले...

वा! वेगळी..आणि छान आहे कविता.

HAREKRISHNAJI म्हणाले...

Surekh kavita ani blog pan

ऊर्मी म्हणाले...

(गायत्री)- धन्यवाद .... माझी माय सरस्वती मुळे स्फुर्ती मिळाली... :-)

ऊर्मी म्हणाले...

(harekrishnaji) - Thank you... Didnt know I have readers too... Its encouraging... Thanks for visiting.

kedar म्हणाले...

Good!! Nice thoughtful poem

Milind Phanse म्हणाले...

कविता आवडली. मात्र 'अलवारं' व 'ऊनं' या शब्दांत अनुक्रमे र आणि न वर अनुस्वार का? अलवार तर बहुधा अव्यय आहे आणि ऊनचे बहुवचन म्हणून ऊनं केले असल्यास 'चमके सप्तरंगी ऊनं' ऐवजी 'चमकती सप्तरंगी ऊनं' हवे.