जगण्याची ...
येता एकेक आठवण
जागे होती मृत क्षण
ताकदीने विलक्षण
प्रसन्न तर कधी सुन्न !
कधी कुणाचे ते बोल
कधी कुणाचा चेहरा
कधी कस्तुरी सुगंध
कधी मोराचा पिसारा !
आभासावर भास
खोल खोल जाई श्वास
मृगजळाची ही कास
जीव घेणारच खास !
काय होई ते नकळे
जसे जीवा लागे पिसे
सत्य आणि असत्यातील
कसे अंतर मिटले !
काहितरी करा
कोणितरी हे थांबवा
मनाचिये रोग
कोणि करेल का बरा?
आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको – पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...
संवेदनशील आणि भिडस्त मनाने टिपलेले काही बरे वाईट अनुभव,
सामाजिक आणि वैयक्तिक जवाबदारीची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या डोक्यात
अविरत चाललेले विचारांचे थैमान
आणि माझी सुरु असलेली धडपड!
मोकळे होण्याची!!
मनात साचलेले, दाटलेले share करण्याची...
पण विचारांची श्रीमंती शब्दांपुढे कंगाल ठरते!
समोरच्याला खुप काही सांगायचे असते,
मुखदुर्बळता असतेच आणि आता त्याला शब्ददुर्बळतेचा साज चढतो...
आणि अभिव्यक्तिचे सारे मार्गच खुंटल्यासारखे होतात.
मनात खुप असते पण ते व्यक्त करता येत नाही...
मनाची अक्षरश: कोंडी होते
आणि मग ही अवस्था
असहाय होऊन डोळ्यांतून वाहु लागते!
कोणी वाचु शकेल का मनाच्या पाटीवरली ही अक्षरे,
न उठलेली?
कोणापर्यंत पोहोचु शकतील का ह्या भावना
नि:शब्द आणि अबोल?
तुमच्यासोबत कधी असे होते का हो?
नाहीतर मीच वेडी म्हणायची...
आणि पुन्हा एकदा
एकला चोलो रे!!
नकळत कळते सारे
शब्दांची गरज नुरे
तव मनात जे जे दडले
ह्या मनास अलगद उमजे
सरसरत शिरवे येता
हा धुंद गंध दरवळतो
मृण्मयीन होउन जाता
जलदाला भानही विसरे
नकळत कळते सारे
शब्दांची गरज नुरे
हळुवार कळीस हा समीरण
स्पर्षाने फुलवत जातो
मोहक सुवासित मग ते
मुदे तयासंग डोले
नकळत कळते सारे
शब्दांची गरज नुरे
नाते असेच अपुले
हलकेच मुग्ध मोहरते
अबोल विश्वासाने
दृढ अन गहिरे होते
नकळत कळते सारे
शब्दांची गरज नुरे
तव मनात जे जे दडले
ह्या मनास अलगद उमजे!!